‘बालपण’—जीवनातील सर्वात निरागस, आनंदी आणि अविस्मरणीय पर्व! आई-वडिलांचे प्रेम, आजी-आजोबांची माया, आप्तस्वकीयांचा जिव्हाळा आणि कुटुंबातील उबदार नात्यांनी विणलेले हे जग किती सुंदर असते! मित्र, खेळगडी, संवगडी, शिक्षक आणि शाळा यांच्या सहवासातून बालपणाला रंग, आकार आणि अर्थ प्राप्त होत असतो.
मुक्तपणे बागडण्याचे, स्वप्नांच्या आकाशात विहार करण्याचे, खेळण्याचे, हसण्याचे आणि जग नव्याने शोधण्याचे दिवस म्हणजे बालपण. या काळातील प्रत्येक अनुभव मनात कायमचा साठून राहतो. म्हणूनच बालपण हे केवळ आयुष्याचा एक टप्पा नसून संपूर्ण आयुष्याला दिशा देणारा पाया असतो.
मात्र काळ बदलत आहे. वय वाढण्यापूर्वीच मुलांवर स्पर्धा, अपेक्षा आणि तंत्रज्ञानाचे ओझे येऊ लागले आहे. परिणामी, निरागस बालपण लवकर हरवत चालल्याची जाणीव होते. अशा वेळी मुलांचे भावविश्व समजून घेणे आणि त्यांचे बालपण अधिक समृद्ध, आनंदी व अर्थपूर्ण बनवणे ही पालक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.
*‘यशोधनच्या गोष्टी’* हे केवळ मुलांसाठीचे कथापुस्तक नाही; ते जीवनमूल्ये, संवेदनशीलता, नात्यांचे महत्त्व आणि आनंदी जगण्याचे धडे देणारे पुस्तक आहे. प्रत्येक बालकाने आणि पालकाने वाचावे असे हे पुस्तक म्हणजे खर्या अर्थाने ‘जगण्याची गोष्ट’ आहे.
| Weight | 0.21 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 21.5 cm |






Reviews
There are no reviews yet.