सीमेवर घडणाऱ्या घटना आपण बातम्यांमध्ये पाहतो.
पण त्या घटनांच्या मागचं राजकारण, सामरिक गणित आणि आंतरराष्ट्रीय समीकरण समजून घेण्यासाठी एका सखोल दृष्टिकोनाची गरज असते.
ब्रिगेडियर (निवृत्त) आर. आर. पळसोकर यांचे हे पुस्तक नेमकं तेच काम करतं घटनांच्या पृष्ठभागापलीकडे जाऊन त्यामागील कारणं, परिणाम आणि पुढील दिशा उलगडून दाखवतं.
यातील काही विशेष मुद्दे –
1. भारत-चीन संबंधातील बदलते स्वरूप आणि वाढती स्पर्धा
2. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील अस्थिरतेचा भारतावर होणारा प्रभाव
3. दहशतवाद, सीमावाद आणि सामरिक धोरणांचा सखोल ऊहापोह
4. गलवान, 26/11, पुलवामा यांसारख्या घटनांमधून उलगडणारी व्यापक चित्ररचन
हे पुस्तक नक्कीच
1. स्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतं
2. संरक्षणशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे
3. गंभीर वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी एक अर्थपूर्ण अनुभव असेल
दोन दशकांच्या घटनांना जोडणारा,
भारताच्या सामरिक प्रवासाचा ठसा उमटवणारा हा ग्रंथ
वाचकाला केवळ माहिती देत नाही, तर त्याची दृष्टी बदलतो.

| Weight | 325 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 21.5 cm |


Reviews
There are no reviews yet.