‘पाणी म्हणजे जीवन’ ही संकल्पना आज अधिक व्यापक अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. पाणी केवळ जीवनावश्यक संसाधन नसून ते एक महत्त्वाचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटक बनले आहे. दोन वस्त्या, दोन गावे किंवा अगदी दोन राष्ट्रांमधील संघर्षांमध्येही पाण्याचा प्रश्न केंद्रस्थानी दिसून येतो. जलस्रोतांवरील नियंत्रण, उपलब्धता आणि वितरण यांमुळे अनेक सामाजिक तणाव निर्माण होत आहेत.या समस्येचा सर्वाधिक परिणाम महिलांवर होत असून, पाण्याशी संबंधित जबाबदाऱ्या त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. तरीदेखील पाणी व्यवस्थापन आणि निर्णयप्रक्रिया मोठ्या प्रमाणावर पुरुषप्रधान राहिलेली आहे. त्यामुळे स्त्रियांचे अनुभव आणि गरजा अनेकदा दुर्लक्षित राहतात.पाणी, स्त्रिया आणि जलस्रोत व्यवस्थापन या परस्परसंबंधांचा सखोल अभ्यास करणारे हे संशोधन सामाजिक वास्तव समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरते. नियोजनकर्ते, धोरणनिर्माते, सामाजिक कार्यकर्ते, संशोधक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी हा ग्रंथ मार्गदर्शक असून सामाजिकशास्त्र आणि प्रत्यक्ष समाज यांच्यातील दुवा निर्माण करणारा महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ आहे.




Reviews
There are no reviews yet.